“जत्रा म्हणजे गावच्या जल्लोषाचा सर्वौच्च बिंदु! पुर्वापार चालत आलेल्या परंपरा व प्रथेनुसार देवदिवाळी संपल्यावर हमखास सुरु होणारा मोसम म्हणजे जत्रा,यात्रा! मग ह्याचं जत्रा-यात्रेवरुन गावकिची एकी कळते नाहीतर दुफळी समोर येते. कारण आजपर्यंत कुणी कितीही हाकाटी पीटली तरी गेल्या पिढीचे सध्याच्या तरुण पीढीशी विचारांचे नाते जुळणे म्हणजे पृथ्वीचे दोन टोके जुळण्याईतके केवळ अशक्य काम!”
देवीदेवतांची असोत की कुळदेवतेची यात्रा म्हणजे संपुर्ण परीवारासह घ्यायचा आनंद! अश्या ह्या गावच्या जत्रेत ग्रामदैवत खंडोबा,म्हसोबा ते कुळदैवत,देवी जोतीबा,खंडोबा पर्यंत यादी जाते. गावच्या जत्रेत मानपान हा ठरलेला असतो जो पुर्वापार पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो. देशमुख,पाटील हे काही विशैष मानाचे घराणे! तसेच,गावोगावी गुरवांकडेही मान असल्याचे दिसुन येते.
गावात ग्रामसभा घेऊन यात्रेची तयारीला सुरवात होते मग जबाबदार्या वाटुन घेत एकुण तीन ते पाच-सात दिवस चालणारा हा ऊत्सव पै-पाहुण्यांना आमंत्रण देत गाव फुलुन भरास येतो. जत्रेत येणारी पाळणे,खेळणी-खाऊचे दुकाने व रात्री मनोरंजनासाठी तमाशे असयाचे ज्यात भर म्हणून नुकतेच पेव फुटलेले नाचाचे कार्यक्रम-ऑर्कैस्र्टा,लावणीचे रंगारंग कार्यक्रम आलेत. ह्यामध्ये भर म्हणुन डान्सबार बंद झाल्यावर आलेल्या नृत्यांगना! अश्याचं ह्या धुमाकुळ घालणार्या नृत्यांगणांचा हा स्पेशल व्हिडीऔ.
बघा व्हिडीओ: