अनुराग कश्यपने नुकतंच सोशल मीडियावर हे सांगितले की त्याला सुशांत सिंह राजपूत बरोबर का काम करायचे नव्हते. अनुरागने एक चॅट पण दाखवला होता ज्यात असे लिहिले होते की सुशांत हा खूप अडचणींमध्ये असलेला माणूस आहे आणि त्याला मी खूप आधीपासून ओळखतो. त्याने पहिला काई पो छे हा चित्रपट केला.
एक मुलाखतीत अनुराग बोलला की सुशांतने दोन चित्रपटांना हा बोलला पण नंतर मधेच त्याने ते सोडले होते. सुशांत बरोबर तो हंसी तो फसी हा चित्रपटही करणार होता पण परिणीती चोप्राने असे सांगून टाळले की ती एक टीव्ही अभिनेत्याबरोबर काम नाही करणार. मुलाखतीत अनुराग असंही बोलला की मी त्याला दोन प्रोजेक्ट बद्दल त्याला बोललो
पण त्याने पहिल्यांदा हो बोलले आणि नंतर काहीतरी कारण सांगून त्याने ते चित्रपट नाही केले. दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसचे चित्रपट मिळाल्यानंतर सुशांतने त्याला कधी संपर्क नाही केला. सुरुवातीला सुशांत हंसी तो फसी यामध्ये होता आणि त्यावेळी आम्ही एका अभिनेत्रीच्या शोधत होतो. आम्ही नंतर परिणीती चोप्राबरोबर बोललो
परंतु परिणीतीने हे बोलून काम करायचे टाळले की ती एका टीव्ही अभिनेत्याबरोबर काम नाही करणार. त्यानंतर अनुरागने परिणीतीला सांगितले की तो काय पो छे करत आहे, पीके करत आहे आणि हंसी तो फसी ज्यावेळी येईल तेव्हा तो टीव्ही अभिनेता नाही राहणार. परंतु त्यावेळी परिणीती शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटाचे काम करत होती.
सुशांतच्या बाबतीत एवढे माहीत झाल्यानंतर तिने यशराज फिल्म्सला हे सगळे सांगितले. नंतर YRF ने सुशांतला बोलवले आणि आमच्याबरोबर काम कर असे सांगितले. हंसी तो फसी या ऐवजी शुद्ध देसी रोमान्स यासाठी काम कर. यानंतर सुशांतने तिकडे डील केली आणि त्यानंतर आमच्याबरोबर काही संबंध नाही ठेवला.
तो असाही बोलला की कोणालाही माहीत आहे की यशराज बरोबर काम करणे सुशांत साठी किती महत्त्वाचं होत यामुळे आम्ही त्याच्या विरुद्ध नाही गेलो. नंतर सुशांत आणि परिणितीची जोडी शुद्ध देसी रोमान्स मध्ये दिसली. तर इकडे अनुरागने हंसी तो फसी हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्राला दिला.