मित्रानो आजवर टीव्हीवर अनेक मालिका आल्या आणि गेल्या. अनेक मालिका झी वाहिनीवर खूप गाजल्या आणि चर्चेत देखील होत्या. दुसरीकडे काही मालिका लोकांना कंटाळवाण्या देखील वाटत होत्या. या कंटाळवाण्या मालिका कधी बंद होतील असे सर्वाना वाटत होते. असे असले तरी दिगदर्शक आपले काम करत असतो कारण त्याला पैसे तर कमवायचे असतातच. मात्र लोकांचं मनोरंजन व्हावं असं देखील त्यांना वाटत असत.
माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे अश्या अनेक मोठ्या मालिका बंद झाल्या. यावरून समजून जा कि प्रत्येक गोष्टीचा शेवट आहे मात्र त्याची वेळ निश्चित नाही. सध्या ओम आणि स्वीटू ची चर्चेत असलेली मलिका येऊ कशी तशी मी नांदायला यामध्ये नवीन ट्विस्ट आले आहे. ओम लंडन ला जाऊन परत आला आहे दुसरीकडे स्वीटूच्या घरचे त्यांचा उद्योग सुधारल्याने सुखाचे जीवन जगत आहेत.
स्वीटू कोकणात गेली असून तिथेच राहायचं स्वप्न पाहत आहे पण स्वीटूच्या वाढदिवशी ओम तिला भेटायला निघाला असल्याने आता मालिका बंद होणार असे वाटत आहे. ओम च्या आईचा खानविलकर बिसनेस मोठा झाला आहे म्हणजेच सर्व काही सुरळीत सुरु असल्यासारखे वाटेत. देवमाणूस भाग दोन हि नवी मालिका देखील येत असल्याने येऊ कशी तशी मी नांदायला हि मालिका बंद होणार असे वाटत आहे. तुम्हाला काय वाटते हि मालिका बंद व्हाव्ही का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.