‘बिग बॉस सीजन १४’ मध्ये तुम्ही पाहतच असाल की, विकास गुप्ता आणि आर्शी खान यांची भांडणे कशामुळे झाली. आर्शी विकासच्या हात धुण मागे लागली होती. तिने पूर्ण ठरवले होते की, आपण विकास गुप्ताला त्रास द्यायचा आणि यामुळेच विकासने तिला रागात स्विमिंगपूल मध्ये ढकलले. त्यामुळे विकासला बिग बॉस मधून बाहेर निघावे लागले.
आपण आज याच आर्शी खानच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहिती घेणार आहोत. आर्शीचा जन्म २९ नोव्हेंबर १९८९ ला अफगाणिस्तान येथे झाला. आर्शी मध्यप्रदेश मधल्या भोपाळ येथील आहे. तिचे संपूर्ण शिक्षणही भोपाळ मध्येच झाले. आर्शीने आजपर्यंत बरेच अभिनय केले आहेत. तिला अभिनयाबरोबरच नृत्याचीही खूप आवड आहे.
सध्या ती मुंबई मध्ये तिच्या कुटुंबाबरोबर राहत आहे. तिच्या वडिलांचे नाव मोहम्मद अरमान खान तर आईचे नाव नादिरा खान आहे. आर्शीने आधी मॉडेलिंग पासून सुरुवात केली. तिने मॉडेलिंग मध्ये बरेच पुरस्कार मिळवले आहेत. ‘माली मिसटी’ हा तिचा २०१४ मधला तामिळ मधला पहिला चित्रपट आहे. बॉलीवूड मध्ये तिने ‘द लास्ट एमपरर’ हा २०१४ मध्ये पहिला हिंदी चित्रपट केला.
२०१७ मध्ये तिने बिग बॉस सीजन ११ मध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. ‘सावित्रीदेवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ ही तिची २०१८ मध्ये प्रसारित झालेली पहिली टीव्ही मालिका आहे. सध्या ती बिग बॉस सीजन १४ मध्येही चॅलेजर म्हणून आली आहे. आर्शीचे क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बरोबर प्रेमसं बंध आहेत असे समजले आहे. तुम्हालाही बिग बॉस सीजन १४ मध्ये दाखवली गेलेली आर्शी खानबद्दल कंमेन्ट मध्ये नक्की सांगा.