‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने अवघ्या काही दिवसातच दर्शकांचे मन जिंकले आहे. आज आपण या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांबद्दल माहिती घेणार आहोत.
या मालिकेत देविकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव मिनाक्षी राठोड आहे. देविका ही गौरीला त्रास देण्यासाठी शालिनीला नेहमी मदत करत असते. यापूर्वी तिने कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पंचबाईची भूमिका साकारली होती. मिनाक्षीचे लग्न अभिनेता कैलास वाघमारे बरोबर झाले आहे. कैलास हा देखील बॉलीवूड अभिनेता आहे आणि त्याने ‘तानाजी’ या हिंदी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याशिवाय त्याने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी नेमकर ही ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनीची भूमिका साकारत आहे. शालिनी हे या मालिकेतील एक नकारात्मक पात्र आहे. या मालिकेत ती नेहमी गौरीला त्रास देत असते आणि तिच्यासाठी वेगळे वेगळे कटकारस्थान रचत असते. माधवीने आजपर्यंत बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केले. २०१० साली तिचे लग्न अभिनेता विक्रांत कुलकर्णी बरोबर झाले आहे. त्या दोघांना आता एक लहान मुलगाही आहे ज्याचे नाव रुबेन आहे. माधवी बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्या मुलाचे व्हिडिओ शेअर करत असते.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री काम करत आहे. हो मित्रांनो तुम्ही बरोबर ओळखलंत, आपण येथे अभिनेत्री वर्षा उसगावकर बद्दल बोलत आहोत. वर्षा यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. तब्बल १० वर्षांनी वर्षा यांनी छोट्या पडद्यावर काम करायला चालू केले आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे लग्न २००० साली अजय शर्मा यांच्याबरोबर झाले आहे. अजय हे सुद्धा दिग्दर्शक आणि निर्माता आहेत.
जयदीपची मुख्य भूमिका अभिनेता मंदार जाधव साकारत आहेत. यापूर्वी मंदारने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. कलर्स मराठीवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत श्री गुरुदत्तांची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. आता मंदार स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ यात जयदीपची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याचे लग्न २०१६ साली मितीका शर्मा बरोबर झाले आहे. त्यांच्या लग्नाला आता चार वर्षे पूर्ण झाली असून त्यांना आता दोन लहान मुलेही आहेत. मित्रांनो या सगळ्या जोडींपैकी तुम्हाला कोणती जोडी आवडली हे सांगायला विसरू नका.