खूप श्रीमंत आणि मोठा व्यक्ती असला की त्याबरोबरच धोका सुद्धा असणारच. यासाठीच मोठ्या व्यक्तींना आपल्यासोबत सेक्युरिटी ठेवावी लागते. अशाच देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कारच नाही तर एक चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे ज्यात अंबानी कुटुंबाला धम’की दिली आहे.
या चिठ्ठीत पूर्ण अंबानी परिवाराला बॉ’म्बने उडवण्याची धम’की मिळाली आहे. कारमध्ये एक पिशवी ठेवली होती त्यामध्ये ही चिठ्ठी भेटली. दक्षिण मुंबईच्या अंबानीच्या घराजवळ गुरुवारी संध्याकाळी एक संशयित गाडी भेटली ज्यात वि’स्फो’टक मिळाली आहेत. या घटनास्थळी जेव्हा पोलीस तपास करत होती त्यावेळी एक चिठ्ठी सुद्धा भेटली ज्यात पूर्ण परिवाराला बॉ’म्बने उडवण्याची धम’की दिली.
या घटनेमुळे अंबानीच्या घराजवळ खूप कडक अशी सुरक्षा व्यवस्था केली आहे. या घटनेमुळे क्रा’ईम ब्राँ’चने आत्तापर्यंत ७ लोकांची चौकशी केली आहे पण या गोष्टीचा कोणालाही सध्या थांगपत्ता लागत नाहीये आणि त्या गाडीबद्दल सुद्धा काही माहिती भेटत नाही. एटीएसने सांगितले आहे की, सध्या क्रा’ईम ब्राँच तपास करत आहे.
कारमधून वि’स्फो’टक मिळाले आहेत. हे वि’स्फो’टक कुठून आले मुंबईतूनच की मुंबई बाहेरून आले याचाही तपास चालू आहे. याबरोबरच हे कोणत्या ग्रुपचे काम तर नाहीये ना हेही पाहिले जात आहे. ध’मकी देण्यामागे काहीतरी उद्देश नक्की होता पण तो काय आहे हे अजूनही कळले नाही. सध्या तिथे कार कशी आली आणि ते वि’स्फो’टक तिथे कसे पोहचले यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
बातम्यांनुसार असे समोर आले आहे की, ज्या लोकांनी एंटीलिया बाहेर गाडीमध्ये वि’स्फो’टक ठेवले होते त्या लोकांनी मुकेश अंबानी यांना फॉलोही केले होते. कारण त्याशिवाय अंबानीच्या गाड्यांसारखा नंबर त्या लोकांना मिळणे शक्यच नव्हते. कारमध्ये जी चिट्ठी मिळाली त्याच्या बॅगवर मुंबई इंडियन्स असे लिहिले होते. याचा क्रा’ईम ब्राँ’चचा पुढील तपास अजूनही चालू आहे.